Sunday, April 24, 2011

साप्ताहिकी

मित्रहो,
गेल्या काही दिवसांपासून मी छोटासा लेखन प्रपंच करीत आहे त्यास प्रतिसादही चांगला आहे.गेल्या चार-पाच दिवसात आपले बालमित्र अवस्थी, संतोष सोमाणी ,सुनील झान्झरी, संजीव नान्दगावकर यांच्याशी फोनवर बोलणे झाले.राजू जरा घाईत होता त्याच्या नवीन महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने बैठक बोलविली होती.नंतर सविस्तर बोलू असे म्हणत तब्बल दहा मिनिट तरी बोलला.संतोष तसा निवांत होता चहा पितो आहे, काय नवीन विशेष?असे विचारत संवाद सुरु केला !संजीवला फोन केला तेव्हा त्याने उत्तरच दिले नाही. कामात असेल नंतर बघू असा विचार करून मी फोन बंद केला तर आज सकाळी त्याचा फोन.छान गप्पा केल्या .चंदू देशमुखच्या तब्येतीबद्दल समजले काळजीचे कारण नाही.संजीवचा मुलगा बी ई अंतिम वर्षाला आहे एका चांगल्या संगणक कंपनीत नोकरी पण मिळाली आहे.कंपनीचे नाव कोग्निझांत[conignant ] त्याच्या सुयाशात आपण सहभागी होऊ या .आशोक हेडाच्या मुलीचे लग्न जून मध्ये आहे असे संतोष कडून समजले.आपण सर्व लग्नात भेटूयात!
--लेखनसीमा ---

ti

No comments: